संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाद्वारे दिनांक 02 ऑक्टोबर, 2014 पासून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र एप्रिल-2018 मध्ये हागणदारी मुक्त झाला आहे. सदर अभियानांतर्गत वैयक्तीक, शैाचालयाचा शाश्वत वापर करणे, गावातील संपूर्ण परिसर, शाळा, आंगणवाडी, शासकीय/ निमशासकीय इमारती, कार्यालये,सहकारी संस्था, सार्वनिक बाजार, एस.टी. स्टँड, यात्रा स्थळे, पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणे स्वच्छ ठेवणे हा उद्देश असून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरून कार्यवाही करण्यात येत आहे.
